Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी


सांगली : येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करूनअभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. संजय पोरे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले, की साधी राहणी व उच्च विचारसरणी आचरणात आणणाऱ्या गांधीजींनी सत्य, अहिंसा, शांतता आणि सहकार ही आदर्श मूल्ये आयुष्यभर जोपासली. या मूल्यांचे आचरण करून गांधीजींनी समाजापुढे जो आदर्श निर्माण करून दिला आहे तो वारसा पुढे प्रत्येकाने चालवला पाहिजे. त्याचप्रमाणे खेड्याविषयी आपुलकी, स्वदेशीचा पुरस्कार, सत्याची शिकवण महात्मा गांधीजींनी स्वतः आचरणात आणली. केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. म्हणूनच त्यांचा जन्म दिवस हा 'जागतिक अहिंसा दिन' म्हणून पाळला जातो.

लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी बोलताना डॉ. पोरे म्हणाले की, लालबहादूर शास्त्री यांच्या अंगी नम्रता, दृढता व आंतरिक शक्ती होती म्हणून ते समाजात लोकप्रिय होते. आजच्या तरुणांनी शास्त्रींच्या अंगी असलेले हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांचा 'जय जवान, जय किसान!' हा नारा आजही देशासाठी प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. विकास आवळे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)